Ads

सुभाषचंद्र बोस

 सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीदास व त्यांच्या आईचे नाव प्रभावती हे होते. सुभाष बाबूंचा शालेय जीवनापासून देशभक्तीकडे ओढा होता. महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यांपासून इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा देण्याची स्वप्ने ते पाहू लागले होते. कलकत्ता विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर सुभाषबाबू वडिलांच्या इच्छेनूसार आय.सी.एस. होण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांनी आय.सी.एस. च्या परिक्षेत उष्कृष्ट यश मिळविले. या परिक्षेचा अभ्यास करण्यास त्यांना अवघा आठ महिन्यांचा कालावधी मिळाला होता तथापि इतक्या थोड्या अवधीत तयारी करूनही ते या परिक्षेत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.


इंग्लंडहून भारतात परत आल्यावर सनदी अधिकारी म्हणून सुभाष बाबूंनी सरकारी नोकरीत प्रवेश केला, परंतु त्यानंतर थोड्याच दिवसात महात्मा गांधींनी इंग्रजी सत्तेच्या विरोधात असहकाराची चळवळ सुरु केली. या चळवळीतील एक कार्यक्रम सरकारी नोकरीचा त्याग करणे असा होता. महात्मा गांधीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सुभाषचंद्र बोस यांनी २२ एप्रिल १९२१ रोजी सरकारी नोकरीतील अत्यंत मानाच्या जागेचा त्याग करुन राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली.


स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देणारे ते पहिलेच आय.सी.एस. अधिकारी होते.


यापुढील काळात सुभाषचंद्र बोस यांनी स्वत:ला सर्वस्वी देशसेवेलाच वाहून घेतले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात ते भाग घेऊ लागले. चित्तरंजन दास यांचे निकटचे सहकारी व अनुयायी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. चित्तरंजनदास यांनीही सुभाषबाबूंचे कर्तव्य व देशभक्ती यांची दखल दऊनत्यांच्यावर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. कलकत्ता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सुभाषबाबू या पदावर असतानाच इंग्रज सरकारने क्रांतीकारकांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून त्यांना अटक केली आणि मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली. कलकत्ता महानगर पालिकेचे महापौर म्हणूनही त्यांची निवड झाली होती.


सुभाषचंद्र बोस यांच्यावर क्रांतीकारी विचारांचा विशेष प्रभाव होता. त्यांच्या क्रांतीकारी विचारामुळे सन १९२६ नंतर राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून त्यांना मान्यता मिळू लागली. विशेषत: देशातील युवक वर्गात तर ते खुपच लोकप्रिय बनले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तरूण नेत्यामध्ये त्यांना महत्वाचे स्थान प्राप्त झाले. सन १९२७ मध्ये सुभाषचंद्र बोस व जवाहरलाल नेहरू या. दोघा युवा नेत्यांची काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड झाली. या निवडीने देशातील तरुणामध्ये मोठे चैतन्य संचारले. नेहरू अहवालात तसेच १९२८ च्या कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. सुभाषचंद्र बोस यांनी वरील मागणीला विरोध केला आणि वसाहतीच्या स्वराज्या ऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी काँग्रेसने करावी, असा आग्रह धरला. अखेरीस महात्मा गांधीजींच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला की, वसाहतीच्या स्वराज्यासाठी इंग्रज सरकारला एका वर्षांची मुदत द्यावी. या अवधीत सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करावी. वरील पार्श्वभूमीवर डिसेंबर, १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत केला. हा ठराव संमत होण्यास सुभाषचंद्र बोस यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झाले होते, हेच यावरून स्पष्ट होते.


सुभाषचंद्र बोस हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील डाळ्या गटाचे नेते म्हणून ओळखले जात होते. काँग्रेसने समाजवादी तत्वांचा अंगीकार करावा, असे त्यांचे मत होते. सुभाषबाबूचे गांधीजीशी अनेक बाबतीत मतभेद होते. १९३७ च्या प्रांतिक कायदे मंडळांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने सत्तेत सहभागी होऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते. गांधीजीच्या तडजोडवादी भूमिकेला सुभाषचंद्रानी अनेक वेळा उघडपणे विरोध केला होता.सन १९३८ मध्ये हरिपुरा कॉग्रेसच अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली. त्यावेळेपासून त्यांच्यातील व इतर नेत्यांतील मतभेद अधिकच


वाढत गेले. १९३९ च्या त्रिपुरी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या निवडणुकीत त्यांच्या विरुद्ध महात्मा गांधी व काँग्रेसचे इतर प्रमुख नेते यांच्या पाठींब्यावर पट्टभी सीतारामय्या हे उधे राहिले. परंतु गांधीजी व इतर नेते यांचा विरोध असताना देखील सुभाषचंद्र बोस हे सीतारामय्यांचा पराभव करुन काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले. या वेळी हे दुर्दैवाने काँग्रेसच्या कार्यकारिणीने सुभाषबाबूंशी असहकार पुकारला, त्यामुळे त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी १९३९ रोजी फॉरवर्ड ब्लॉक' हा स्वत: चा वेगळा पक्ष स्थापन केला. 'फॉरवर्ड ब्लॉक' चे पहिले अधिवेशन मुंबईत २२ जून १९३९ रोजी भरले.


दुसरे महायुध्द सुरु झाल्यावर काँग्रेसने इंग्रज सरकार विरुध्द तीव्र आंदोलन सुरु करावे, असा आग्रह सुभाषबाबूंनी धरला. त्यांच्या या भूमिके मुळे इंग्रज सरकारने त्यांना अंतर्गत सुरक्षा कायद्या खाली अटक केली. पुढे त्यांची कैदेतून सुटका झाली, परंतु त्यांना त्यांच्या घरातच नजर कैदेत ठेवण्यात आले.


या नजर कैदेतून नेताजींनी १७ जानेवारी १९४१ रोजी अत्यंत शिताफीने व विस्मयकारकपणे स्वत:ची सुटका करुन घेतली. वेगवेगळी नावे धारण करुन ते गुप्तपणे प्रथम अफगाणिस्तानात जाऊन पोहोचले आणि तेथून त्यांनी जर्मनीस प्रयाण केले. तेथे बर्लिन नभोवाणीवरून भारतीय जनतेला उद्देशून त्यांनी भाषणे केली आणि ब्रिटिशाविरुध्द सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले. नेताजींनी हिटलरसह काही प्रमुख जर्मन नेत्यांच्या भेटी घेतल्या. याभेटीत जर्मनीने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला साहाय्य करावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. जर्मनीत त्यांनी इंडियन इंडिपेन्डन्स लीग' या नावाची संघटना स्थापन केली.


जर्मनीत भारतीय स्वातंत्र्यासाठी आपणास काही भरीव स्वरूपाची कृती करता येणार नाही, असे लक्षात येताच सुभाषचंद्र बोस जर्मनीहून एका पाणबुडीतून जपानला गेले. यावेळी रासबिहारी बोस यांनी युध्दात जपानच्या हाती सापडलेल्या भारतीय युध्दकैदयाच्या मदतीने 'आझाद हिंद सेने' ची स्थापना केली होती. आझाद हिंद सेनेचे दुसरे अधिवेशन सन १९४२ मध्य बँकॉक येथे भरले. या अधिवेशना साठी सुभाषबाबूंना निमंत्रण देण्यात आलेहोते. त्यावरुन नेताजी य अधिवेशनास उपस्थित राहिले. त्या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी नेताजींना आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. नेताजींनी ती मान्य केली आणि ४ जुलै १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस 'आझाद हिंद सेने चे सरसेनापती बनले.


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वा मुळे आझाद हिंद सेनेच्या जवानांमध्ये नवचैतन्य संचारले. नेताजींनी या सेनेची अनेक पथके उभारुन त्यांना गांधी पथक, नेहरू पथक अशी नावे दिली. त्यांनी 'झांशी राणी' या नावाने स्त्री सैनिकांचेही एक पथक उभारले आणि त्यांचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन यांच्याकडे सोपविले. (कॅप्टन स्वामिनाथन याच नंतरच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल. यांनीचा डाव्या आघडीच्या पुढाकाराने डॉ. अब्दुल कलाम यांच्या विरोधात सन २००२ ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली होती, अर्थात हे पद दोन महान व्यक्तीपैकी एकाच व्यक्तीस मिळणे अपरिहार्य होते.)


सुभाषचंद्र बोस यांनी २१ ऑक्टोंबर १९४३ रोजी सिंगापूर येथे हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापना केले. या सरकारला जर्मनी, जपान, इटली इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली. नेताजींनी आझाद हिंद सेनेला शस्त्रसज्ज बनविले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या सैनिकांच्या मनात राष्ट्र प्रेमाची ज्योत चेतविली व त्यांना आपल्या मातृभूमीची परदास्यातून मुक्तता करण्यासाठी असीम त्यांग करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर नेताजींनी आझाद हिंद सेनेला "चलो दिल्ली" असा आदेश दिला. सन १८५७ च्या उठावानंतर यावेळी प्रथमच "चलो दिल्ली" चा नारा आसमंतात दुमदुमला. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूँगा" अशी हाक त्यांनी आपल्या सैनिकांना दिली.


देशभक्तीने प्रेरित झालेल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी मातृभूमीच्या दिशेने आगेकूच चालविली. मेजर जनरल शाहनवाजखान, कॅप्टन सहगल, कर्नल धिल्लाँ, मेजर जगन्नाथराव भोसले, कर्नल हबीनूर रहेमान इत्यादींच्या कुशल नेतृत्वा खाली आझाद हिंद सेनेने अनेक नेत्रदीपक विजय संपादन केले. तिने अंदमान व निकोबार बेटांवर आपणे नियंत्रण प्रस्थापित केले. पुढील काही दिवसात तर तिने हिंदुस्थानच्या सरहद्दी पर्यंत धडक मारली. हिंदुस्थानातील माऊडॉक, कोहिमा इत्यादि ठाणी जिंकून ही सेना इंफाळपर्यंत येऊन पोहोचली, परंतु तिला इंफाळ मात्र जिंकता आले नाही.आरव योर नेत्यांची


याच सुमारास महायुध्दाचे पारडे फिरण्यास सुरुवात झाली. जर्मनी, जपान, यांची निरनिराळ्या आघाडयांवर पिछेहाट होऊ लागली. त्याबरोबर आझाद हिंदू सेनेलाही माघार घेणे भाग पडले. जपान सरकारच्या निवेदनानुसार, सुभाषचंद्र बोस एका विमानाने टोकियोला जाण्यास निघाले असताना त्या विमानाला फोर्मोसा म्हणजेच ताईहोकू बेटावरील विमानतळावर अपघात झाला या अपघातात १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा दुर्दैवी अंत झाला.


आझाद हिंद सेनेच्या मदतीने ब्रिटिशांचा पराभव करुन आपली मातृभूमी परदास्यातून मुक्त करण्याचे नेताजींचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. परंतु त्यांचे कार्य, देशप्रेम, त्याग, ध्येयनिष्ठा व घडाडी यांच्या दर्शनाने असंख्य भारतीयांची मने राष्ट्रभक्तीने पेटून उठली आणि त्यांना देशसेवेची नवी प्रेरणा मिळाली. अशा प्रकारे नेताजींनी आपल्या बलिदानातून राष्ट्रीय स्वातंत्र्य साठी प्राणांची बाजी लावून परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याचा संदेश आपल्या देशबांधवाना दिला.


भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात सुभाषचंद्र बोस यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.



सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस Reviewed by D beldar on ऑक्टोबर ३१, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Ads

Blogger द्वारे प्रायोजित.